Posts

बुद्ध : आमच्या उन्मुक्त माणूसपणाचा आरंभ

माणूस होणं म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचे उत्तर हजारो वर्षे कुणालाही मिळाले नाही. पण 1956 मध्ये एका ऐतिहासिक निर्णयाने लाखोंनी तो मार्ग निवडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 आपल्याला बुद्ध दिला. इथल्या शोषित, वंचित, पीडित मनुष्याला माणूस म्हणून मान मिळवून द्यायचा असेल, तर बुद्धाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. इथल्या विषमतावादी व्यवस्थेला हादरा देणारा 'आद्य क्रांतिकारक' जर कोणी असेल, तर तो बुद्धच. विषमतावादी हिंदू धर्माने माणूसपण नाकारलेल्या लाखो शोषितांना बुद्धाने स्वीकारले, न्यायाच्या कुशीत घेतले. कधी कधी मनात विचार येतो, की 1956 साली अशिक्षित असलेल्या पिढीने एका झटक्यात 33 कोटी देव घराबाहेर कसे फेकले? कोणताही प्रश्न न विचारता लाखोंच्या संख्येने नागपूरला एकत्र जमले आणि बाबासाहेबांच्या मागे चालत बुद्ध धम्म स्वीकारला. हे कोणत्या प्रचाराने नाही, तर लोकांचा बाबासाहेबांवर असलेल्या निर्विवाद विश्वासामुळे शक्य झाले. त्या काळच्या पिढीकडे शिक्षण, माहिती, साधने, इंटरनेट काहीच नव्हते, पण त्यांच्याकडे होती ती बाबासाहेबांवर निष्ठा. त्यांनी बाबासाहेबांवर ठाम विश्वास ठेवून देव-धर्माचा गोंग...

हिंदू चौकटीत अडकलेले पुरोगामी आणि वैज्ञानिक बुद्ध धम्म

थोर वैज्ञानिक अल्बर्ट आइंस्टाईन म्हणतो - "If there is any religion that would cope with modern scientific needs, it would be Buddhism." पुरोगाम्यांना चांगले माहिती आहे , की बुद्ध धम्म विज्ञानावर आधारित आहे. बुद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानात ना कोणतेही चमत्कार आहेत , ना अंधश्रद्धा , ना देवपूजा. तर्क , अनुभव , आणि शाश्वत सत्याचा शोध हीच बुद्ध धम्माची मूलभूत तत्त्वे आहेत. परंतु , हिंदू पुरोगाम्यांना स्वतःच्या हिंदू धर्माच्या चिखलातून बाहेर पडता येत नाही. यामुळेच ते चुकीचे तत्त्वज्ञान मांडून हिंदू धर्माच्या कसोट्या बुद्ध धम्मावर लावण्याचा प्रयत्न करतात. "बौद्ध संस्कृती नाही ," "बौद्ध लग्नांमध्ये पांढरे कपडे घालतात ," असे बिनबुडाचे आरोप करत लोकांसमोर हिंदू धर्म , मोडीत काढता येत नाही म्हणून बुद्ध धर्म देखील वाईटच भासवण्याचा प्रयत्न करतात. हिंदू पुरोगाम्यांचे खरे दुखणे हे आहे , की बुद्ध धम्माच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे तो पारंपरिक धर्माच्या संकल्पनेच्या पलीकडे जातो. हिंदू धर्मातील ब्राह्मणवादी चालीरीती , देवपूजा , कर्मकांडे आणि जातीय व्यवस्था या पुरोगामी संस्कृतीच...

जात टिकवणारे शिक्षित...!

शिक्षण केवळ ज्ञान देते असे नाही , ते कोणत्या मूल्यांच्या चौकटीत तुम्हाला दिले जाते , हे ठरवते की माणूस माणूस बनतो की भेदभावाचे साधन. शिक्षण जर जात नष्ट करण्याचे साधन नसेल , तर ते जात टिकवण्याचे शस्त्र ठरते. हेच आपण आज शिक्षित सवर्ण पुरुष , बायका आणि मुलींना पाहताना अनुभवतो. ब्राह्मण , सवर्ण आणि इतर उच्च जातीतले लोक शिकतात आणि जातिव्यवस्थेच्या संरक्षणासाठी झटतात. शिक्षणानंतर ते ‘Merit’, ‘Quality’, ‘Hard Work ’ अशा शब्दांचा शाब्दिक असा पाढा वाचतात की जणू त्यांनी आयुष्यात काहीच विशेषाधिकार उपभोगलेले नाहीत. आरक्षणावर टिका करताना त्यांची भाषा घशात बसलेला माईकसारखी मोठी असते , पण स्वतःच्या जातीतून मिळालेल्या ओळखी , कौटुंबिक भांडवल , आणि संबंधांनी मिळालेल्या संधीवर कधीच चकार शब्दही काढत नाहीत आणि सवर्ण बायका? त्यांचा फेमिनिझमही जातिअंध आहे. तो मूळ समस्यांवर कधीच बोट ठेवत नाही. त्यांना जातीच्या अधिष्ठानावर आधारित असलेल्या पितृसत्तेचे भानच नाही. त्यांच्या चर्चेचा गाभा ‘दारू , बीडी , सिग्रेट , शरीरस्वातंत्र्य’ इथवरच मर्यादित असतो. बुद्ध , फुले , बाबासाहेब , सावित्रीबाई या त्यांच्या स्त्रीवादी नक...

सम्राट अशोक : धम्माने घडवलेला सम्राट

सम्राट अशोकाच्या बाबतीत एक बाब नेहमीच ठळकपणे लक्षात येते. ती म्हणजे, बुद्धाच्या मार्गावर जाताना त्याने केवळ वैयक्तिक परिवर्तनच केले नाही, तर एक व्यापक आणि करुणामय साम्राज्य उभं केलं. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबाबत इतिहासकारांनी भरपूर प्रमाणात चर्चा केली, त्याच्या पतनावरच प्रकाश टाकला. पण कलिंग युद्धानंतर निर्माण झालेले साम्राज्य किती करुणेचा आणि कल्याणाचा मार्ग इतरांसाठी मोकळा करणारे होते, याकडे दुर्लक्ष केले. सम्राट अशोकाने आपल्या जीवनाचा प्रवास शिलालेखांमधून कोरून ठेवला. जर हे शिलालेख आणि शिल्प नसते, तर अशोकाचा आणि बौद्ध इतिहासाचा मोठा भाग अंधारात राहिला असता. विशेषतः बौद्ध धम्माच्या दृष्टीने, अशोकाच्या काळातील ही ऐतिहासिक साक्ष अनमोल आहे. अशोकाच्या बाबतीत काही दंतकथा पसरवून त्याचे क्रूर चित्र रंगवले गेले. पण त्या कथा जितक्या टोकाच्या होत्या, तितका तो क्रूर सम्राट नव्हता. कलिंग युद्धानंतर त्याच्या मनात झालेले परिवर्तन त्याला इतिहासात अजरामर करून गेले. अशोक ‘सम्राट’ बनला यामागे सर्वात मोठे योगदान बुद्धाच्या धम्माचे होते. नीतिमत्ता, तार्किक विचार, प्रज्ञा, प्रेम, करुणा आणि अहिंसेच्या ...

मनोज कुमार: देशप्रेमाच्या कथेतील अस्पष्ट जातीयता

मनोज कुमारचं निधन झाले. भारतीय चित्रपटसृष्टीला देशप्रेमाच्या माध्यमातुन त्याने एक विशिष्ट दृष्टिकोन दिला. ‘उपकार’, ‘पूरब और पश्चिम’, ‘क्रांती’, ‘शोर’, ‘रोटी, कपडा और मकान’ हे सर्व चित्रपट त्यांच्या देशभक्तिपर कलाकृतीचे उत्तम प्रतीक बनले. पण त्याचबरोबर, त्यांचे चित्रपट पाहतांना एका बाबीची कायम खंत वाटत राहिली, या साऱ्या चित्रपटांमध्ये देशाभिमानाचे गोड गाणे होते, पण देशातल्या जातिव्यवस्थेच्या कुरूपतेवर कधीही हात घालायची त्याची हिंमत झाली नाही. आजच त्याचा एक छोटासा Interview ऐकला, त्यात तो 'उपकार' चित्रपटाची कथा कशी सुचली याबाबत भाष्य होते. तो म्हटला, "मी गोस्वामी आहे आणि गोस्वामी म्हणजे जमिनीचे मालक, ब्रिटीशांच्या "The Land Acquisition Act, 1894" च्या कायद्याने आमची जमीन गेली, आणि त्याकाळी नेत्यांना नेमके कोणते कायदे घ्यायचे तेही कळले नाही आणि आमची जमीन गेली. मी कोणत्याच नेत्याला मानत नाही. मी रिक्षावाल्याला सलाम करेल, शेतकर्‍याला सलाम करेल, पण कोणत्याही नेत्या समोर झुकणार नाही." एकंदरीतच मनोज कुमारने फार मोठा कार्यकाळ पाहिला. नेमके कोणत्या नेत्याला मानत नाही,...

शिर्डीपासून अक्कलकोटपर्यंत : बाबावादाचे ब्राह्मणी षड्यंत्र

ज्या लोकांना जन्मतारखा नसतात त्यांचे प्रकटदिन साजऱ्या केल्या जातात. शिर्डीचे साईबाबा , शेगावचे गजाजन बाबा आणि नव्यानेच ज्यांचे प्रस्थ वाढत चालले आहे ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ. ह्या तिन्ही बाबांचे महाराष्ट्रात प्रकटदिन साजरे केले जातात. कारण , ब्रिटीशांच्या कार्यकाळात हे बाबा होऊन गेले असा दावा केल्या जातो , तरी त्यांच्या जन्मतारखेच्या कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंटेशन झालेले नाही. प्रश्न हा आहे की , मग हे प्रकट कसे झाले? कोणी केले? कुठून आले? आणि आता बहुजनांच्या माथ्यावर कोणी मारले? ग्रामीण भागात पहिले विठ्ठल एकच देवता होती , तेही देवता नव्हते माणूस होते आणि तेच लोकांना प्रिय होते. पण मागील काही काळामध्ये विठ्ठलाचे महत्व कमी करून ह्या तिन्ही बाबांचे महत्व महाराष्ट्रात वाढलेले आपल्याला दिसेल. विठ्ठलाची उपासना ही महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या सांस्कृतिक ओळखीशी निगडीत आहे. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ही ओळख प्रबळ झाली , आणि त्याचे केंद्रबिंदू पंढरपूर राहिले आहे , हा इतिहास आहे. पण ह्या तिन्ही बाबांनी काय केले आहे समाजासाठी? कोणता इतिहास आहे यांचा? ब्रम्हांड नायक म्हणून मिरवणाऱ्या या...

मार्क्सवादाची शिस्त, आंबेडकरवाद

कार्ल मार्क्स आजही जगभर वाचला जातो, जगात असे क्वचितच लोक सापडतील जे मार्क्सच्या तत्त्वज्ञानाने भारावून गेले नसतील. कारण मार्क्सचे अनुयायी त्याच्याशी नेहमीच प्रामाणिक राहिले. भारतातील मार्क्‍सवादी लोकांनी इथल्या शोषितांचे प्रश्न कधीही सोडवले नाही, तो भाग वेगळा. कारण, भारतातील मार्क्‍सवादी खोटारडे निपजले आणि सर्वण लोकांच्या हातात मार्क्‍सवाद बंदिस्त झाला. असे असूनही मार्क्‍सवादी विचारधारेला, केवळ त्याचे विचार वाचून थांबले नाहीत, तर त्यातून एक संपूर्ण विचारधारा - एक School Of Thought उभी केली. Marxism हा जगात विचार राजकीय पातळीवर अपयशी ठरला असला, तरी त्याला सिद्ध करणारे, टिकवणारे, प्रसारित करणारे अनुयायी त्याच्याशी कधीही गद्दारी करत नाहीत. कार्ल मार्क्स स्वत: फक्त ग्रंथांत वावरला, Volume वर Volume लिहीत बसला, कधीही रस्त्यावर उतरला नाही, कामगारांच्या चळवळीत देखील कधी कोणत्या महिलेसह आंदोलन केले नाही. पण त्याचे अनुयायी रस्त्यावर उतरले. त्याच्या विचारांनी लोकांनी चळवळी उभ्या केल्यात, सत्ता मिळवली, हरल्या तरी पुन्हा उभ्या राहिल्या. कारण त्याच्या अनुयायांनी मार्क्सला मरू दिले नाही. त्याचे नाव,...