Posts

Showing posts from October, 2024

मराठीतील थर्ड क्लास सुविचार

मराठीतील आजपर्यंतचे सर्वांत थर्ड क्लास सुविचार - 1) अज्ञानात माणूस सुखी असतो. 2) साधी राहणी उच्च विचारसरणी. अज्ञानात माणूस सुखी कसा राहील? अज्ञान दूर करून तो सुखी होऊ शकत नाही का? दुसरे, जर तुमचे विचार उच्च असतील तर तुम्हाला उच्च पद्धतीने राहण्यास काय अडचण आहे? अज्ञानात माणूस सुखी असतो म्हणणे म्हणजे , त्याला अज्ञान म्हणजे सत्याची, वास्तवाची जाणीव नसणे असा त्याचा अर्थ होतो. जेंव्हा माणसाला अन्याय, शोषण किंवा दु:खाची जाणीव होत नाही, तेव्हा त्याला ते दु:ख नाही, असा अर्थ या सुविचारात दडलेला आहे. वरवर पाहता हे असले सुविचार काही काळापुरते धीर देतात, परंतु पुन्हा काय? कारण, सत्याच्या जाणिवे पासून दूर पळून जाणे हे कधीही खूप काळासाठी सुख देणारे नसते. याउलट अज्ञान दूर करून जे सत्य आपल्यालाला ज्ञात होईल ते खरे सुख आहे. उगाच काहीतरी बोगस सुविचार तयार करायचे, म्हणजे एखाद्याने जसे आहे तसे अज्ञानात सुखी मानून स्वतःला सांत्वन देत रहायचे. त्याचप्रमाणे, ते साधी राहणी उच्च विचारसरणीचा सुविचार, हाही सुविचार असाच वरकरणी मोहक आणि सुंदर. उलट मी तर म्हणेल ह्या सुविचाराला Follow करणारे अतिशय जातीवादी असतात. सा...

धर्मांतर...

बाबासाहेबांचे धर्मांतर केवळ धार्मिक पद्धती बदलण्याचा निर्णय कधीही नव्हता, तर तो सामाजिक क्रांतीचा एक महत्त्वाचा टप्पा होता. अस्पृश्यतेचा प्रश्न हिंदू धर्मातील एका धार्मिक पद्धतीने सुटणार नव्हता, त्यासाठी संपूर्ण सामाजिक व्यवस्थेत बदल घडवून आणणे गरजेचे होते. हिंदू धर्मातील अनेक नेत्यांनी अस्पृश्यतेच्या प्रश्नावर काही वरवरचे उपाय सुचवले होते, परंतु त्या उपाययोजनेतून किती हिंदू सुधारले? मोठा प्रश्न आहे. उलट, या नेत्यांनी अस्पृश्यतेचा विचार फक्त धार्मिक श्रद्धेतूनच सोडवता येईल, असा मोठा भ्रम निर्माण केला. बाबासाहेबांनी मात्र या विचारसरणीचा तीव्र विरोध केला, आपल्या मुक्ती कोण पथे मध्ये बाबासाहेब म्हणतात, हिंदू धर्मात राहून हिंदूना सुधारणा करतो, म्हणणारे मला अर्धवट विचारांचे वाटतात आणि मला त्यांचा आता तिटकारा आला आहे. हिंदू धर्मातील सुधारकांनी अस्पृश्यतेला 'कलंक' म्हटले, परंतु एकाही नेत्यांनी, तथाकथित सुधारकांनी हिंदू धर्मालाच कलंक म्हणण्याची हिंमत दाखवली नाही. बाबासाहेबांनी मात्र स्पष्टपणे सांगितले की, हिंदू धर्मच विषमतेचा, शोषणाचा आधार आहे, त्यामुळे त्यात सुधारणा शक्य नाही. आजही धर...

पुरोगामीतत्व व अंतर्गत दांभिकता...

पुण्यात मराठ्याच्या मुलाला रूम शोधताना ब्राह्मण कुटुंबियांनी रूम नाकारली म्हणून, स्पेस वर काही बहुजनांनी / पुरोगामी लोकांनी त्यांचे जाती भेदाचे अनुभव सांगितले. विशेष मला यात काय वाटले असेल तर ते, म्हणजे मराठ्यांना आता कळतेय, जातिभेद काय असतो तो, कारण आजपर्यंत मराठ्यांनी सुद्धा कमी जातीभेद केला नाही. फुटक्या कपात चहा देणे, दलितांच्या लग्नात न जेवणे, दलितांना घराच्या बाहेरच्या बाहेरूनच हाकलून लावणे, दलितांच्या हातात पैसे वरून फेकणे, दलितांच्या मुला-मुलींना त्यांच्याशी प्रेम विवाह न करू देणे... अशी असंख्य उदाहरणे, मराठ्यांनी केलेल्या जातीभेदाची देता येतील.  बहुसंख्य शिवाजी महाराजांना मानणारा मराठा, ब्राम्हणां सारखं जातीभेद कधी व केंव्हापासून, कितव्या शतकात करायला शिकला? हेच मोठे कोडे उलगडले नाही अजून.... मराठ्यांनी कधी स्वतःला ब्राह्मणांच्या रांगेत स्वतःला नेऊन बसविले, परंतु आता ब्राम्हणांनी त्यांची जागा दाखवून दिल्यामुळे त्यांना आता आपल्यापेक्षा खालच्या जातीने काय भोगले असेल याची त्यांना जाणीव होत आहे. आजपर्यंत, ब्राह्मणांच्या आडून मराठ्यांनी जातीभेद केला नाही असे आपल्याला वाटते , पर...

धम्मक्रांती...

धर्मांतर म्हणणे आता खरंतर म्हणणे बंद केले पाहिजे.  कारण, धर्मांतराने माणसाचे केवळ श्रध्दा स्थान बदलतात , परंतु ज्यावेळेस आपण धम्मक्रांती म्हणू , त्यावेळी एक संपूर्ण समाजाच्या नैतिक आणि सामाजिक मूल्यांचे पुनर्निर्माण करण्याचा मार्ग त्यात दडलेला दिसेल. बाबासाहेबांनी धम्माला केवळ अध्यात्मिक दृष्टिकोनातून कधीच पाहिले नाही , तर त्यांचे उद्दिष्ट एका न्यायपूर्ण , समताधारित , आणि बंधुत्वावर आधारित समाजव्यवस्था निर्माण करणे हे आहे. मुक्ती कोण पथे मध्ये बाबासाहेब म्हणतात - "धर्मांतर हा केवळ मौजेचा विषय नाही. हा माणसाच्या जीवनातील निर्वाण साध्य करण्याचा प्रश्न आहे."  ते पुढे सांगतात की , धर्मांतराची तयारी अगदी जहाज एका बंदरातून दुसऱ्या बंदरात घेऊन जाण्याइतकीच गंभीर असते. बाबासाहेबांनी धर्मांतराचे विश्लेषण दोन प्रकारांनी केले : एक सामाजिक आणि ऐहिक दृष्टिकोनातून, दुसरे धार्मिक व तात्विक दृष्टिकोनातून. धर्मांतर हे राष्ट्रांतर किंवा वस्त्रांतर  नव्हे, अशी त्यांची ठाम आणि स्पष्ट भूमिका होती. आपले धर्मांतर ही अशी एका धम्म क्रांतीची सुरुवात आहे, ज्याचा उद्देश केवळ वैयक्तिक किंवा अध्यात्मिक...

सोज्वळ भांडवलदारी चेहरा रतन टाटा

रतन टाटांच्या मृत्यू नंतर सर्वांचा कंठ दाटून आला. तसे पाहिले तर, त्यांच्या औद्योगिक कार्यापेक्षा त्यांच्या साधेपणाचीच लोकांनी जास्त चर्चा केली. आजच्या घडीला, सध्याच्या भांडवलशाही व्यवस्थेत जगभरात केवळ पैसा कमावणे नव्हे, तर एक चांगला भांडवलदार म्हणून स्वतःला सोज्वळ, साधाभोळा आणि सुसंस्कृत म्हणून सिद्ध करणे ही नव्या काळातील एक यशस्वी रणनीती आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रतन टाटा. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या "सोज्वळ" व्यक्तिमत्त्वाचे गौरवगीत गायले जात आहे. परंतु, वास्तवात, या सर्व मिथकांमागची सत्यता वेगळी आहे.  रतन टाटांच्या नेतृत्वाखालील जमशेदपूर स्टील प्रकल्प हा एक मोठा उद्यम ठरला, पण या यशामागे स्थानिक आदिवासींचा प्रचंड गेलेला बळी आहे. स्टील प्रकल्पासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी डिमना तलाव हा कृत्रिम तलाव बांधण्यात आला, पण या तलावासाठी स्थानिकांची जमीन बळकावण्यात आली. स्थानिकांना जमीनबदलाची योग्य किंमत तर दिलीच नाही, उलट तलावामुळे स्थानिक इकोसिस्टीम बिघडली, ज्याचा परिणाम थेट त्यांच्या शेतीवर झाला. अडाणी आणि अंबानी यांच्या सारखेच, टाटा ग्रुपसारख्या प्रतिष्ठित उद्योगांनी सुद्...

परंपरेच्या चौकटीत अडकलेली स्त्रीशक्ती

आजपासून नवरात्र महोत्सव सुरू झाला. नवरात्रीच्या सणामध्ये नऊ दिवस स्त्रीच्या शक्तीचे गुणगान गाणे, तिच्या विविध उपमांद्वारे तिच्या प्रतिमा निर्माण करणे हे समाजाची एक परंपरा बनली आहे. या दिवसांमध्ये आदी शक्तिच्या नावाखाली परंपरा, संस्कृती म्हणून एका स्त्रीचे महत्व रटाळ पद्धतीने पटून दिले जाते. शेतकरी जातींचे सण, सीतेची पूजा म्हणजेच काळ्या जमिनीची पूजा विविध संदर्भात तुम्हाला ऐतिहासिक महत्व या उत्सवात मांडून स्त्री शक्तीचे गुणगान गायले जाते. हे सगळे मांडण्यात आजकाल चांगले विचारवंत पुढे यायला लागले आहेत. विविध सणाच्या निमित्ताने आपण परंपरा, संस्कृती आणि मूल्ये कशी जपली पाहिजेत हे इथल्या स्त्रियांना कळले पाहिजे वगेरे बोलणारे. परंतु, परंपरा, संस्कृती आणि मूल्ये जपणारी स्त्री कशी भरडली जातेय यावर कुणीही विचारवंत मत मांडत नाहीत. सणानिमित्ताने आज कोणती साडी, उद्या कोणता रंग यासारख्या बाह्य गोष्टींवर जोर देणे आणि त्याची ऐतिहासिक बाजू सांगून स्त्रीला गुरफटून ठेवणे, हेच निरंतर सुरू आहे. सुशिक्षित असो वा निरक्षर, उच्च वर्णीय स्त्रीवादी स्त्रिया देखील या परंपरेत मूग गिळून गप्प बसलेल्या असतात. हे सर्व...

गांधीवाद : दलितविरोधी विचारांचा इतिहास

आधुनिक राजकारणात रामराज्याची संकल्पना मांडणारे , भगवद्गीतेला प्रचलित वर्णाश्रम धर्माचे कट्टर समर्थक , आणि धर्माच्या आधारावर देशाच्या फाळणीला संमती देणारे , परंतु देशांतर्गत दलितांच्या स्वतंत्र मतदारसंघाला ठाम विरोध करणारे , सनातनी हिंदू धर्माचे कट्टर प्रसारक गांधीजी हे नेहमीच समाजाच्या तळागाळातील वंचित आणि दलितांच्या हक्कांना दुय्यम स्थान देत आले. राष्ट्रीय चळवळीचे प्रणेते असणारे , भारतातील सामाजिक सुधारणांना डावलून होणारी राष्ट्रीय चळवळ , जिथे भारतातच एका वर्गाला पाणी पिण्याची परवानगी नसताना , तरीही गांधीजी स्वतःला सामाजिक सुधारक म्हणून मांडताना , वारंवार दलितांच्या , शोषितांच्या राजकीय , सामाजिक , आणि धार्मिक हक्कांसाठी उभे राहणाऱ्या चळवळींचा विरोध केला. गांधीजींनी दलितांना 'हरिजन' म्हणजेच 'हरिची मुले' असे संबोधून त्यांचे अस्तित्व कमी लेखले , त्यांना स्वतःच्या हक्कांसाठी लढण्याची इच्छा आणि क्षमता नाही अशी धारणा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दलितांना 'हरिची मुले' संबोधून त्यांचे स्व:ताचे व्यक्ती म्हणून अस्तित्व नाकारणारे गांधी , दलितांच्या स्वतंत्र ओळखीकडे फक्...