Posts

Showing posts from January, 2024

30 जानेवारी...

30 जानेवारी 1948 ज्या दिवशी सर्व जग एका शोकाकुल वातावरणात निघून गेले. क्षणार्धात काय झाले हे, कुणाला काही कळलेच नाही. आपल्या सोबत असणारे गांधी, पापणी लवण्याच्या आत कसे निघून गेले? आभा आणि मनूच्या खांद्यावर हात ठेवुन, प्रार्थनास्थळी जाणारे गांधी अचानक कोसळले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो देह, एक नीरव शांतता घेऊन निपचित पडला होता. तो, हडकुळा देह शेवटी जातानाही सांगत होता, अहिंसा हाच मोठा धर्म आहे... बुद्धाची शांतता त्या, देहावर जाणवत होती. समुद्रलाही, लाटा जोरजोराने लाटा धडकाव्यात... आणी त्या लाटेत आपण कुठेतरी निघून जावे. असेच हे वातावरण होते. गांधीजींचा मृत्यू म्हणजे आपला मृत्यू आणि देशाचा मृत्यू अशी जनभावना उमळू लागली.      नेहमीप्रमाणे वेळेवर जाणाऱ्या गांधीजींना, त्या दिवशी प्रार्थना स्थळी जाण्यासाठी 10 मिनिट उशीर झाला. वेळेच्या बाबतीत गांधीजी कधीच चुकत नसत. प्रत्येक, कामात वेळ पाळणारे गांधीजी मात्र त्या दिवशी वेळ पाळण्याचे चुकलेत. इकडे दिल्लीतील बिर्ला भवन संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी, प्रार्थनास्थळ खचाखच भरलेले होते. तत्पूर्वी , बिर्ला भवनमध्ये गांधीजी नुकत्याच स्वतंत...

धर्मनिरपेक्ष देशाची धार्मिक गोष्ट...🔱🇮🇳🔱

धर्मनिरपेक्षता युरोपमधील ही विचारधारा असून , अतीतवादाला बाजूला सारून मानवी व्यवहारांसाठी स्विकारलेला एक इहवादी दृष्टिकोन.  ब्रिटानिकाच्या व्याख्येनुसार धर्मनिरपेक्षता म्हणजे सरकार , शिक्षण किंवा समाजाच्या इतर सार्वजनिक भागांमध्ये धर्माची भूमिका असू नये असा विश्वास आणि दुसरे म्हणजे अधर्म , निधर्मीपणा, नास्तिकता, किंवा धर्मविरोध म्हणजे धर्मनिरपेक्षता नाही. परंतु , भारतातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप), आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला “हिंदू राष्ट्र ” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईश्वरशासित हिंदू राष्ट्राच्या उत्तरोत्तर वाटचाल करीत आहे. धर्मनिरपेक्षता गेली खड्ड्यात आणि आजच्या राममंदिर प्राणप्रतिष्ठा स्थापनेने तर खऱ्या अर्थाने एका धर्मनिरपेक्ष देशाची वाटचाल कशी हिंदू राष्ट्राकडे होत आहे, यावर शिक्कामोर्तब झाला. ज्या हिंदू धर्माचे इतके उदात्तीकरण केले जातेय, त्या हिंदू धर्माला कुठलाही एकमेव धर्म संस्थापक व ईश्वरी प्रेषित नाही, आणि म्हणूनच की काय हिंदूचा एकमेव प्रमाण असा पवित्र ग्रंथही नाही आणि तरीही हिंदू धर्म धोक्यात असल्याच्या आरोळ्या ठोकून धर्मांध लोकांसा...

राम देव की माणूस?

माणसातील राम हरवला आहे म्हणण्यापेक्षा राम आधी माणूस होता की देव होता हे सिद्ध करणे आवश्यक आहे. देवाला माणसात शोधण्याची व माणसात देव शोधण्याची गरज का पडते आहे? रामाला देवत्व बहाल केल्यामुळे रामाच्या चांगल्या बाजूलाच आजपर्यंत धर्मांध लोकांनी महत्व दिले आहे. रामाला माणसात शोधण्याचा प्रयत्न करण्यापुर्वी रामाची माणूस म्हणून तुम्ही चिकित्सा केली आहे आहे का?  रामाची उपासना करणारे लोक राम या देवाची उपासना करतात व त्यातील माणसाची नाही. एखाद्याला देव बनविले की माणसाचे तर्कशास्त्र आणि तार्किक बुद्धी दोन्ही नष्ट होते. रामाला तुम्ही देव बनविले तर मग तो माणसाचा देव बनला असे म्हणता येत नाही आणि माणसातील राम हरवला आहे हे तर मुळीच नाही. देव म्हणून रामाचे माणूसपण काय आणि कोणते होते हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. रामाला रामाचे तरी कोणते माणूसपण चिकटले आहे?  रामाची देव म्हणून बाजू पाहताना -  1) राम मर्यादा पुरुषोत्तम असतो. 2) एक आदर्श राजा असतो. 3) पुरुषार्थ सिद्ध पुरुष असतो. 4) कर्तव्य पालन करणारा असतो. हे गुण भक्ताला आदर्श वाटतील. परंतु , जर राम आदर्श असेल तर मग देव कुणाला म्हणायचे? राम देव ...

बाबासाहेब आणि आदिवासी लोक...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करण्यासाठी त्यांनी आदिवासी लोकांसाठी काय केले? असा प्रश्न विचारून हिंदुत्ववादी लोक मुद्दाम, खोडसाळपणे आणि निर्बुद्धपणे, तर्कहीन, बिनबुडाचे आरोप त्यांच्यावर नेहमीच करतात. कोणत्याही पुस्तकाचे पान टाकून, समाजात विष कालवणाऱ्या आणि आशा लोकांवर विश्वास ठेवणारे लोक तर त्यापेक्षा जास्त महामूर्ख वाटतात. आदिवासी लोकांसाठी काहीच केले नाही , सर्व काही स्वतःच्या जातीसाठी केले, असे आरोप करून तुम्हाला काय साधायचे असते? आदिवासींच्या मनात भेदभाव निर्माण करून, स्वतः मजा बघायची. असेच ना? वाचा आता... आदिवासी लोकांबद्दल डॉ. आंबेडकरांनी आपल्या ॲन्हिलेशन ऑफ कास्ट पुस्तकात काय म्हटले वाचा - “ संस्कृतीच्या मध्यभागी जगणारे तेरा लाख लोक अद्यापि रानटी अवस्थेत आहेत आणि पारंपरिक गुन्हेगारीचे जीवन कंठत आहेत. परंतु हिंदूंना त्याची कधीच लाज वाटली नाही. हे दृश्य माझ्या मते अगदीच अद्वितीय आहे. या लाजिरवाण्या स्थितीचे कारण काय? या आदिवासींना सुसंस्कृत करण्याचा आणि त्यांना चरितार्थासाठी अधिक सन्माननीय मार्गावर आणण्याचा कोणताही प्रयत्न का झाला नाही? आदिवासींच्या या रानटी अवस्थेसाठी त्यांन...

बलात्कार पीडित - स्त्री समाज व न्याय ⚖️

बावीस वर्षांपूर्वी आपल्यावर झालेल्या सामूहिक बलात्कार विरोधात बिल्किस बानो न्यायालयात दाद मागत आहेत. बलात्कार झाला तेव्हा पाच महिन्यांची गरोदर असलेल्या बिल्किसच्या घरातील एकाच कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली होती. सामूहिक बलात्कारानंतर तीन तास बेशुद्धावस्थेत असलेल्या बिल्कीसचा मृत्यू का झाला नाही म्हणून, तिलाही अनेक वेळा मारण्याचा कट रचण्यात आला. एका घटनेने उद्ध्वस्त झालेले बिल्किसचे कुटुंब सावरत नाही तोपर्यंत तिच्यावर समाजरूपी कंटकांनी असंख्य वेळा बलात्कार केले. बिल्कीस बानोचे अख्खे कुटुंब दंगलीत होरपळले. आजही न्याय मिळावा म्हणून तिचा एकटीचाच संघर्ष अविरतपणे सुरू आहे.  दंगलीनंतरचे सामूहिक बलात्कार भारतात व जगातही नवीन नाहीत, भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीदरम्यान अंदाजे 75,000 ते 100,000 महिलांचे अपहरण आणि सामूहिक बलात्कार झाले. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात लाखो महिलांवर बलात्कार झालेत. भारतात बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलीतही महिलांना मारण्यात आले. सामूहिक बलात्काराच्या निर्भया, कोपर्डी, हाथरस, उन्नाव अशी प्रकरणे समोर आहेत व जे सामाजिक न्यायाच्या प्रतिक्षेत ताटकळत उभ...

अडगळीतील सुधारणावादी ब्राम्हण स्त्रियां...

निर्बुद्ध, कुंठित, कुत्सितपणे, कपटी वागणाऱ्या आजच्या ब्राम्हण स्त्रिया संविधानापेक्षा मनुस्मृतीचा गर्व करतात...! विचारांनी सडलेल्या बुद्धीच्या जोरावर सावित्रीबाई फुलेंवर शंका घेतात, शेण फेकल्याचे पुरावे मागतात, शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुलेंनी शोधली का, डॉ. आंबेडकरांनी इंग्रजांना साथ दिली का, असले नीच, हलकट, घाणेरडे व निर्लज्ज प्रश्न विचारतात. लाज वाटते का, शूद्र लोकांनी समाजसुधारणेचा पाया उभा केला म्हणून स्विकारायला?  आजच्या असल्या ब्राम्हणामुळे, इतिहासातील चांगले ब्राम्हण देखील अडगळीत पडलेल्या अवस्थेत आहेत. समाजसुधारक असलेल्या ब्राम्हणांचा हेच ब्राम्हण द्वेष करतात व त्यांच्या कर्तुत्वावर पाय फिरवतात. ब्राम्हणी वर्चस्वाखाली काही ब्राम्हण कधीच दबले नाही व सुधारणा चळवळीत त्यांनी देखील हिरिरीने भाग घेतला मग ती स्त्री असो की पुरुष. आधुनिक काळात ब्राम्हणी, भटाळलेल्या स्त्रिया सावित्रीबाईंना तर सोडा, ब्राम्हणी सुधारणावादी स्त्रीला देखील आदर्श मानत नाहीत. मनुवादी, ब्राह्मण्य, कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी जोपासण्यात धन्यता मानतात.  सुधारणावादी चळवळीला विरोध करण्यासाठी ब्राम्हण...