Posts

Showing posts from April, 2024

हुंडा आणि पुरुषी मानसिकता...

NCRB च्या डेटा नुसार 2022 मध्ये 6450 हुंडाबळींची नोंद झाली. म्हणजेच दर दिवशी 17 नवविवाहित मुलींची हत्या झाली. ही तर नोंद झालेली आकडेवारी आहे. ज्या केसेस नोंदविण्यात आल्या नाहीत त्याची संख्या तर याच्या दहापट असेल. मुलींच्या मागण्यांवर प्रश्न चिन्ह निर्माण करणाऱ्या मुलांना प्रश्न आहे. हुंडाबळी म्हणून मुलांचा बळी कधी गेला आहे का? मुलगी हुंडा देत नाही म्हणून स्वतःला कधी विहिरीत ढकलून दिले का? गळफास घेऊन आत्महत्या केली आहे का? हुंडा तिनेच द्यायचा, वरून मागण्या देखील करायच्या नाहीत. अरे, लग्न करतात की एकमेकांवर उपकार करताय? मुलींनी मागण्या केल्या तरी अडचण, हुंडा दिला तरी तिचा बळी, नाही दिला तरी तिचाच बळी. करायचे काय त्या मुलींनी? आम्ही हुंडा घेत नाही म्हणणारे मुले देखील, सोने मागतात, कार मागतात, फ्रीझ, सोफा, पलंग अरे बापरे अजून काय-काय ? तुमच्या घरी काहीच नसते का? प्रतीकात्मक पद्धतीने का होईना आम्ही असा हुंडा घेणार आणि गावभर सांगत हिंडायचे, आम्ही हुंडा घेतलाच नाही. हे दोगलेपण काय कामाचे? पहिली गोष्ट तुम्हाला मुलगी नको असते आणि मुलगी हवी आहे तर बिनपगारी 24 तास राबणारी नोकर हवी असते.  काही...

क्रांतिकारी महात्मा फुले...

भाई माधवराव बागल म्हणतात की, "कार्ल मार्क्सच्या अगोदर समतेची दृष्टी महात्मा फुले यांनी महाराष्ट्राला दिली." भारतात काय जगातही मार्क्‍सवादी संघटना उदयास आल्या नव्हत्या, तेंव्हाच महात्मा फुले स्त्री दास्य विरुद्ध आंदोलन, शेतकरी समस्या, अस्पृश्यांचे प्रश्न, शोषितांचे प्रश्न शिक्षणाच्या चळवळीतून आधीच सोडवून बसले होते. आजच्या शतकात आम्ही शोषितांचा लढा लढतो असा दावा करणार्‍या मार्क्‍सवादी लोकांचे हात थरथरतील अशा प्रश्नांना भिडण्याची हिम्मत 1848 मध्येच फुलेंनी केली होती.  महात्मा फुले आणि बाबासाहेबांचा जन्म होईपर्यंत एकाही मार्क्‍सवादी लोकांना कामगारांचे आणि मजुरांचे प्रश्न महत्वाचे वाटले नाहीत. फुले दाम्पत्यांनी स्व-खर्चातून मुलींच्या शाळा चालवल्या, विधवां स्त्रियांचे प्रश्न मांडले, शेती कामगारांचे प्रश्न सोडवले, इतकेच काय पुण्यात प्लेगची साथ आली तेंव्हा मार्क्‍सवादी लोकांचे आदर्श टिळक पुणे सोडून फरार झाले आणि सावित्रीमाईंनी प्लेग रुग्णांची आपल्या अंगा खांद्यावर घेऊन अविरतपणे सेवा केली. शिवाजी महाराजांची जयंती टिळकांनी सुरू केली म्हणून त्यांचा उदो-उदो करणारे ब्राम्हण आणि मराठा फुले...

भारतातील मूळ समस्या - जात

भारतातील डाव्या लोकांना सगळया समस्येचे मूळ कारण जात आहे हे मान्य नसते म्हणून सकाळी हा प्रश्न विचारला. गरिबी आणि जातीची तुलना कुठेच होऊ शकत नाही. कारण, गरिबीपेक्षाही काही भयंकर असेल तर ते म्हणजे जातव्यवस्था आहे. तुमची जात खालची असेल आणि तुम्ही गरीब असाल तर तुम्हाला दोन्ही समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे , जातव्यवस्था भारतातील मूळ समस्या आहे हे परत एकदा सिद्ध झाले. जातआधारित तुमचे शोषण होत असेल तर तुम्ही गरीब आहात की श्रीमंत आहात याने तितकासा फरक पडत नाही. जातीवरून उद्भवत असलेल्या समस्या आणि गरिबीवरून उद्भवत असलेल्या समस्या ह्या वेगवेगळया स्वरूपाच्या असतात. आजचा दलित जर श्रीमंत असला तरी, पहिले त्याची जात शोधली जाते त्यानंतर त्याचा पैसा. याउलट मात्र सवर्ण लोकांचे. ते कितीही गरीब असले तरी त्यांची जात शोधली जात नाही. अत्याचाराच्या परिसीमा देखील आपल्याकडे जात केंद्रित आहेत.  खालील दोन उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल. 1) खैरलांजी प्रकरण 2) कोपर्डी प्रकरण दोन्ही उदाहरणे पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहेत. खैरलांजी प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून महाराष्ट्र इतका पेटून ...

समतावादी बुद्ध...

बुद्धाची चिकित्सा करताना इतिहास अभ्यासकांनी बुद्धाच्या मर्यादा मांडताना बुद्धाला विषमतेचा पुरस्कर्ता म्हणून घोषित केले. यामागे कारण, बुद्धाने सुरुवातीला स्त्रियांना संघात घेण्यास नकार दिला होता. बुद्धाने स्त्रियांच्या संघातील सहभागाला विरोध दर्शवित असताना, खालील चार बाबी स्त्रियांच्या बाबतीत उद्गारल्यात.  1) पहिल्यांदा स्त्रीचे मुखदर्शन टाळावे. 2) तोंडासमोर तोंड आले तर जवळ जाऊ नये. 3) जवळ जाण्याचा प्रसंग आलाच तर बोलू नये. 4) बोलणे भागच पडले तर हरणाचे अवधान राखावे. संघात स्त्रियांचा समावेश केला तर आपला धम्म 500 वर्षे मागे जाईल, ही त्यामागे बुद्धाची काळजी होती. बुद्धाच्या या विचारावर लेनिन म्हणतो की, "समाज परिवर्तक चळवळ परिपक्व झाली आहे, की नाही हे पाहायचे एकच लक्षण आहे. आणि ते म्हणजे समाजपरिवर्तक चळवळीत स्त्रियांचा सहभाग किती आहे? या पार्श्वभूमीवर बुद्धाने स्त्रियांकरिता काय केले? बुद्धाच्या काही मर्यादा होत्या. कारण तो भगवान नव्हता. माणूस होता. बुद्ध हा स्त्री-पुरुष विषमतेचा समर्थक होता. सामाजिक समतेच्या त्याच्या विचारातली ही अत्यंत मोठी त्रुटी होय, असे मला प्रामाणिकपणे वाटते....

शिवाजी महाराज एक रहस्यमय मृत्यू...

शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला याबाबत मोठा संभ्रम आहे. कारण शिवाजी महाराज ज्या वयात गेले, त्या वयात जाणे खरंतर अशक्य आहे. कारण, वय वर्षे फक्त 50 होते. शिवाजी महाराजांचा मृत्यू, हा नैसर्गिकरीत्या झाला आहे की, त्यांचा खून झाला आहे, याबाबतीत इतिहासकार साशंक आहेत. शिवाजी महाराज, हे शरीराने धाडधिप्पाड होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू इतक्या कमी वयात होणे शक्य वाटत नाही. आजही शिवाजी महाराजांचा मृत्यू महाराष्ट्रासाठी गूढ आहे. आणि त्यातील रहस्यही कायम आहे.     शिवाजी महाराजांचा मृत्यू हा एक अनुत्तरीत प्रश्न आहे. त्यांचा मृत्यू, कसा झाला? कोण्या अवस्थेत झाला? त्यांचा खून झाला? की त्यांना कोणी फसवून मारले? कोणी विषबाधा केली? असे, असंख्य प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळाली नाही आहे. आणि जी माहिती शिवाजी महाराजांच्या मृत्यूबद्दल उपलब्ध, आहे ती ज्याची त्यांनी, त्यांचा मृत्यू कसा झाला हे पटून देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसते. बर्‍याच, इतिहासकारांचे असे म्हणणे आहे, शिवाजी महाराजांचा मृत्यू हा नैसर्गिकरीत्या झाला. कुणी म्हणते त्यांच्यावर विषप्रयोग केला. कुणी म्हणते, त्यांना कट करुन मारले. खरतर, शिव...