Posts

Showing posts from March, 2025

शिर्डीपासून अक्कलकोटपर्यंत : बाबावादाचे ब्राह्मणी षड्यंत्र

ज्या लोकांना जन्मतारखा नसतात त्यांचे प्रकटदिन साजऱ्या केल्या जातात. शिर्डीचे साईबाबा , शेगावचे गजाजन बाबा आणि नव्यानेच ज्यांचे प्रस्थ वाढत चालले आहे ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ. ह्या तिन्ही बाबांचे महाराष्ट्रात प्रकटदिन साजरे केले जातात. कारण , ब्रिटीशांच्या कार्यकाळात हे बाबा होऊन गेले असा दावा केल्या जातो , तरी त्यांच्या जन्मतारखेच्या कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंटेशन झालेले नाही. प्रश्न हा आहे की , मग हे प्रकट कसे झाले? कोणी केले? कुठून आले? आणि आता बहुजनांच्या माथ्यावर कोणी मारले? ग्रामीण भागात पहिले विठ्ठल एकच देवता होती , तेही देवता नव्हते माणूस होते आणि तेच लोकांना प्रिय होते. पण मागील काही काळामध्ये विठ्ठलाचे महत्व कमी करून ह्या तिन्ही बाबांचे महत्व महाराष्ट्रात वाढलेले आपल्याला दिसेल. विठ्ठलाची उपासना ही महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या सांस्कृतिक ओळखीशी निगडीत आहे. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ही ओळख प्रबळ झाली , आणि त्याचे केंद्रबिंदू पंढरपूर राहिले आहे , हा इतिहास आहे. पण ह्या तिन्ही बाबांनी काय केले आहे समाजासाठी? कोणता इतिहास आहे यांचा? ब्रम्हांड नायक म्हणून मिरवणाऱ्या या...

मार्क्सवादाची शिस्त, आंबेडकरवाद

कार्ल मार्क्स आजही जगभर वाचला जातो, जगात असे क्वचितच लोक सापडतील जे मार्क्सच्या तत्त्वज्ञानाने भारावून गेले नसतील. कारण मार्क्सचे अनुयायी त्याच्याशी नेहमीच प्रामाणिक राहिले. भारतातील मार्क्‍सवादी लोकांनी इथल्या शोषितांचे प्रश्न कधीही सोडवले नाही, तो भाग वेगळा. कारण, भारतातील मार्क्‍सवादी खोटारडे निपजले आणि सर्वण लोकांच्या हातात मार्क्‍सवाद बंदिस्त झाला. असे असूनही मार्क्‍सवादी विचारधारेला, केवळ त्याचे विचार वाचून थांबले नाहीत, तर त्यातून एक संपूर्ण विचारधारा - एक School Of Thought उभी केली. Marxism हा जगात विचार राजकीय पातळीवर अपयशी ठरला असला, तरी त्याला सिद्ध करणारे, टिकवणारे, प्रसारित करणारे अनुयायी त्याच्याशी कधीही गद्दारी करत नाहीत. कार्ल मार्क्स स्वत: फक्त ग्रंथांत वावरला, Volume वर Volume लिहीत बसला, कधीही रस्त्यावर उतरला नाही, कामगारांच्या चळवळीत देखील कधी कोणत्या महिलेसह आंदोलन केले नाही. पण त्याचे अनुयायी रस्त्यावर उतरले. त्याच्या विचारांनी लोकांनी चळवळी उभ्या केल्यात, सत्ता मिळवली, हरल्या तरी पुन्हा उभ्या राहिल्या. कारण त्याच्या अनुयायांनी मार्क्सला मरू दिले नाही. त्याचे नाव,...

बौद्ध मुखवट्यातले ब्राह्मण

चला आज नकली मनू बौद्धांचा निकालच लावू...!  आंबेडकरवादी लोकांवर हुकूमशाहीचा आरोप होतोय. भावडय़ा आधी एक सांग , हुकूमशाही म्हणजे काय ते माहितेय का? की स्वतःचा फक्त ब्राह्मणी अहंकार दुखावल्यामुळे कुठूनतरी शब्द उचलून आणलास आणि आंबेडकरवादी लोकांच्या तोंडावर फेकून मारला ? आंबेडकरवादी लोक हुकूमशहा व्हायला काय ,  आंबेडकरवादी लोकांनी कुणाचे हक्क मारलेत का ? कुणाला गुलाम केलेय का? कुठे धार्मिक दंगे घडवलेत , कुणाच्या घरादारावर हल्ले केलेत का? नरसंहार घडवला का? नाही ना? मग हुकूमशाही कशी आली आणि कुठून आली? आंबेडकरवादी असणे गुन्हा काय आहे? न्याय , समता , बंधुता यासाठी आवाज उठवणे चुकीचे आहे का ? लोकशाही बद्दल वाचलेय का कधी ? समाजात माणूस म्हणून जगण्याची मागणी करणे म्हणजे हुकूमशाही वाटत असेल , तर तुमची बामणी मानसिकता तुम्हाला लखलाभ! तुमच्या डोक्यात आंबेडकरवादी लोक आता हुकूमशहा झाले आहेत , कारण एवढेच आहे , ते तुमच्या वर्चस्वाला आव्हान देतात. बाबासाहेब म्हणाले , शिका , संघटित व्हा , संघर्ष करा आणि ते आंबेडकरवादी लोक करतायत. तर तुम्हाला त्रास काय आहे नेमका? आम्ही चुप बसत नाही म्हणून? हजारो व...