Posts

Showing posts from February, 2025

छावा : इतिहासाचं भावनिक शोषण आणि विचारांची गळचेपी

छावा पाहून झाला... संभाजी महाराजांना कसे मारले हे आधीच माहिती असल्यामुळे मी भावूक होऊन चित्रपट पाहण्याचे कटाक्षाने टाळले. चित्रपटातील सर्वांच्या भूमिका चांगल्या होत्या. विकी कौशल पेक्षा अक्षय खन्ना मार खाऊन गेला. रश्मीका मराठी होती नव्हती याने काही जास्त फरक पडला नाही कारण राजा तरी कुठे मराठी दाखवला. संगीताची तर गोष्टच न्यारी, संभाजी महाराजांच्या प्रत्येक भावूक क्षणाला अजान लावण्याचे काम ए. आर. रेहमानने बखुबी निभावले. त्यामुळे, डायरेक्टरला जे दाखवायचे ते त्याने दाखवून दिले आणि मला जे पहायचे होते ते पाहून झाले. काय खरे आणि काय खोटे ते इतिहासाचे गाढे अभ्यासक शोधत बसतील. एक मात्र...चित्रपटामुळे हिंदू मुस्लीम लोकांचा जे काही वाद सुरू झालाय, त्यावरून डायरेक्टर यशस्वी झालाय असे म्हणायला काही हरकत नाही असे मला वाटते. राहिला प्रश्न... आता संभाजी महाराज मुख्य पात्राचा... हा चित्रपट पाहून बामण खुश झाले म्हणजे यातच सर्वकाही आले. बामण खुश झाले म्हणजे समजायचे बामणांचे काहीतरी हित साधले गेले आहे. राजा संभाजीचा इतिहास पडद्यावर कोणीतरी आणला म्हणून लगेच खुश होणार्‍या लोकांची अक्कल गुडघ्यात आहे म्हणावे ...

जातीय अहंकार आणि फॅंड्री

काल रात्री फॅंन्ड्री मुव्हीवर Twitter स्पेस आयोजित केली होती. नागराज मंजुळेच्या या चित्रपटात भारताची मूळ समस्या 'जात' व्यवस्थेवर भाष्य आहे, त्यावर मूळ चर्चा करायची सोडून स्पेस मधील मंडळीनी, भरलेल्या पोटाने पारावर चहा प्यायला बसलेल्या लोकांसारख्या केवळ गप्पा हाणल्यात. (चर्चा देखील नाही बरं का). या लोकांच्या फॅंन्ड्री वरील गप्पांवरून लक्षात आले, फॅन्ड्री ची कथा ह्या लोकांसाठी केवळ 'फँटसी' आहे, त्यांनी त्या वास्तवाला केवळ 'कथा' म्हणूनच स्वीकारले, त्यातल्या मूळ समस्येकडे पाहण्याचे टाळले आणि वरवरच्या बाबींवर गप्पा मारत राहिले. हीच ह्यांची खरी मानसिकता नागराज मंजुळेच्या चित्रपटांच्या मुळाशी आहे. विशेषतः ज्या लोकांना त्यांच्या जातीचा विशेषाधिकार आहे, असेही लोक फॅंन्ड्रीवर बोलत होती, आणि जातीय विशेषाधिकार प्राप्त ही लोक, जी लोक जातीवर खऱ्या अर्थाने भाष्य करत होती त्यांना बोलू नका म्हणत होते, जात व्यवस्थेवर आपण वेगळी स्पेस आयोजित करू बोलत होती. इथेच स्पेसवरच लोकांचा जातीय अहंकार दिसून आला. काहींचे म्हणणे असे होते की, "दलितांनी दलितांसाठी केलेली मुव्ही आहे." हे ...

Brahmin Genes आणि जातीय नैतिकतेचे डबल स्टँडर्ड

उदित नारायण उच्चभ्रू आणि उच्च जातीतील मैथील ब्राह्मण व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांनी कितीही पोरींना Kiss करत फिरलं , तरी कोणी त्यांना नैतिकतेचे धडे देणार नाही, किंवा त्यांच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणार नाही, त्यांना नैतिकतेचे डोस पाजणार नाही. कारण, भारतीय समाजात उच्चजातीयांना मिळणारा तो विशेषाधिकार आहे. हेच जर एखाद्या खालच्या जातीतील ओबीसी, दलित किंवा आदिवासी कलाकाराने केली असते, तर आतापर्यंत त्याला जबरदस्त प्रसारमाध्यम ट्रायलचा सामना करावा लागला असता. त्यांच्यावर सार्वजनिकरित्या हल्ले झाले असते आणि त्याच्या संपूर्ण कारकीर्दीला डाग लागला असता. इथे Twitter, Facebook वर दिवसरात्र दारूचे फोटो टाकणारे सुद्धा विनोद कांबळीला दारूवरून लक्ष करतात, आणि सचिन तेंडुलकर इतका फ्लॉप खेळून देखील त्याच्या फ्लॉप वर कोणी शंका घेत नाही. विनोद कांबळीला केवळ एका गोष्टींवरून धारेवर धरले, त्याच्या चारित्र्यावर हल्ले केले, त्याला सुधारगृहात पाठवण्याची मागणी झाली. आता उदीत नारायणला कोणी शिव्या घालणार नाही, कारण ते त्याचे व्यक्तिगत जीवन आहे आणि त्याला तसे वागण्याचा अधिकार आहे, म्हणून कोणी त्याला नैतिकता स...