Posts

Showing posts from September, 2024

पुणे करार : एक अपयश

स्वतंत्र मतदारसंघाचे महत्व काय होते? त्याचा काय परिणाम झाला असता? पुणे करार का अनुत्पादक ठरला? यासारख्या कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आजचे आंबेडकरी विचारवंत आणि कार्यकर्ते गंभीर विचार करताना दिसत नाहीत. पुणे करारामुळे पहिल्या निवडणुकीत SC मतदारसंघावर कसा घात झाला , बाबासाहेबांनी त्या निवडणुकीचं विश्लेषण कसे केले आणि त्यांनी "Qualified Electorate" साठी का संघर्ष केला? याबद्दलही पुरेशी चर्चा कोणी करत नाही. बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीसाठी जंगजंग का पछाडले , कारण त्यांना पुणे कराराच्या मर्यादा आणि त्याचा धोका जाणवला होता. पुणे करारामुळे खऱ्या प्रतिनिधित्वाऐवजी कृत्रिम समावेशकता निर्माण झाली , ज्यामुळे दलित समाजाच्या प्रतिनिधित्वावर आघात झाला. बाबासाहेब हे जाणून होते की , आता "Qualified Electorate" हा एकमेव उपाय होता , जो समाजाच्या खऱ्या प्रतिनिधित्वाला योग्य दिशा देईल. मात्र , आजचे आंबेडकरी विचारवंत आणि चळवळीचे सदस्य या कोणत्याही प्रश्नांकडे अजिबात लक्ष देत नाहीत. यात दुसरी चिंताजनक गोष्ट म्हणजे , आज राजकारणाचे स्वरूप आणि चळवळीकडे पाहण्याचा दृष्टिको...

वाचन आणि विवेकवाद

तुम्ही वाचन खूप करत आहात आणि तुमची Rational Thinking जर Develop होत नसेल तर ते वाचन निरर्थक ठरते. केवळ वाचन करणारे लोक माहितीचा साठा जमा करत असतात , त्यावर विचारविमर्श करत नसतात. इथे काही लोक वाचनासाठी प्रसिद्ध आहेत तर काही लोक पुस्तक हातात घेऊन फोटो पोस्ट करण्यापुरती. केवळ पुस्तके वाचून किंवा माहिती मिळवून कोणीही विवेकवादी ठरत नाही. विवेकवादाचा अर्थ आहे , त्या माहितीचे तर्कबुद्धीने विश्लेषण करून आपल्या विचारसरणीत आणणे, त्यातून योग्य निष्कर्ष काढून , त्यानुसार आचरण करणे. इथे असणारे पुरोगामी आम्ही किती Progressive विचारांचे आहोत हे सतत दाखवत असतात , परंतु त्यांचा Progressive पणा लगेच दिसून पडतो , आम्ही किती Progressive आहोत ते. फुले , शाहू , आंबेडकर यांचे वाचन केले तरी जर तुम्ही त्यांचे विचार तात्त्विक आणि तर्कशुद्ध रीतीने आचरणात आणत नसाल , तर ते वाचन निरर्थक ठरते. Twitter वरील काही लोक पुस्तकप्रेमी म्हणून प्रसिद्ध आहेत. अगदी फुलांपेक्षा मला पुस्तक देऊन प्रपोज करावे इथपर्यंत त्यांचे पुस्तकांप्रती प्रेम उतू गेलेले आहे. लग्नात देखील आहेरांऐवजी ते पुस्तकेच नातलगांना भेट देतील इतके पुस्तक त...

पेरियार विरुद्ध शरद पाटील : बहुजनांच्या विचारधारेची दिशा...

CJI चंद्रचूड आणि पंतप्रधान दोघांनी एकत्रित मिळून गणपतीची आरती करणे , ही घटना फक्त आरती करण्यापुरती पुरती मर्यादित नाही , तर संपूर्ण संविधानाच्या स्वायत्ततेवर हल्ला आहे. संविधानाच्या मूळ गाभ्याला धक्का लावून , त्याच्या मूल्यांचा सार्वजनिकरीत्या अपमान केला जात आहे. भारतीय लोकशाहीचे मुख्य आधारस्तंभ असलेल्या Judiciary, Legislature, आणि Executive या तिन्ही संस्था आज धार्मिक आणि सांस्कृतिक वर्चस्ववाद्यांच्या हातातील खेळणे बनल्या आहेत आणि Media बद्दल तर बोलायलाच नको. गणपती पूजा किंवा इतर कोणत्याही धार्मिक सोहळ्यांत सहभागी होणे हे व्यक्तिगत अधिकार असू शकतो , पण जेव्हा देशाचे सर्वोच्च न्यायाधीश आणि पंतप्रधान सार्वजनिकरित्या असे धार्मिक प्रदर्शन करतात , तेव्हा त्यामागचा अर्थ मोठा व्यापक असतो. आपली न्यायव्यवस्था स्वतंत्र असल्याचे आता फक्त एक आभासी चित्र उरले आहे. मात्र वास्तविकता अशी आहे की , त्या न्यायव्यवस्थेवर विशिष्ट जातीचा , हिंदुत्ववादी विचारसरणीचा खोलवर प्रभाव पडत चालला आहे. निर्णय घेणारे न्यायाधीश आणि त्यांच्या निर्णयांवर होणारा दबाव आता कोणत्या दिशेने आहे , हे आपल्याला अशा वागण्यातून दिस...