पाण्याच्या ग्लासात लपलेली जातीय असमानता
ब्राम्हण व्यक्तीने दलितांना पाणी देणे आणि त्याला "खरा भारत" असल्याचे सांगणे म्हणजे असमानतेला मान्यता देणे होय. ही कृती एकतर्फी आहे , ज्यात दलिताला केवळ स्वीकारणाऱ्याच्या भूमिकेत ठेवले जाते , देणाऱ्याच्या नाही. बघा मित्रांनो... जात कशी काम करते ते – याचाच अर्थ असा की , अद्यापही समाजात ब्राह्मणांना उच्च आणि दलितांना नीच मानले जात आहे आणि हे सामाजिक समतेच्या तत्त्वांच्या विरुद्ध आहे. कॉंग्रेसची विचारधारा कधी सामाजिक तत्त्वांना धरून होती? उलट , अनेकदा ब्राह्मणवादी विचारांना अप्रत्यक्षपणे पोषण दिले गेले आहे आणि आजही असे Tweet करून दलितांना कायमस्वरूपी खालच्या स्थानावर ठेवले जाते. अरे , राहुल गांधीने ग्लास मध्ये पाणी टाकले नसते तर खर्गेनी काय पाणी पिले नसते का? हे असले विधान करून फक्त तुम्ही कॉंग्रेसच्या विचारधारेचे कौतुक केले. परंतु , आंबेडकरवादी विचारसरणीने दलित समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या संघर्षाची तुम्ही उपेक्षा केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दलित समाजाने आपल्या हक्कांसाठी लढा दिला , ज्यामुळे त्यांना हा सन्मान आणि अधिकार प्राप्त झाला आणि हा सन्मान , अधिक...