Posts

Showing posts from March, 2024

मराठा आरक्षण...

मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे यात काही दुमतच नाही. परंतु, मराठा खरच स्वतःला मागासवर्गीय म्हणून घेण्यास तयार आहे का? कारण, आरक्षण मागासवर्गीय लोकांसाठी आहे. आरक्षण मिळाले तरीही गोरगरिबांना या आरक्षणाचा काहीही एक फायदा होणार नाही कारण आजही गरिबांना लुबाडणारा श्रीमंत वर्ग आहे. गरिबांच्या आरक्षणाचा फायदा श्रीमंत लोक घेणार नाहीत कशावरून? आरक्षण मिळाले तरीही गोरगरिबांना हे श्रीमंत मराठे फायदा होऊ देणार नाहीत. आरक्षण हे आर्थिक निकषावर दिले पाहिजे असा मुद्दा उपस्थित करत आहेत? आर्थिक निकषावर गरीब - श्रीमंत मराठे तुम्ही कसे ठरवणार? कारण,श्रीमंत मराठे आम्ही कसे गरीब मराठे आहोत हे सिद्ध करण्यासाठी धडपडणार व गरीब मराठ्यांची स्थिती जैसे थे राहण्याची पुन्हा एकदा दाट शक्यता आहे. मराठ्यांनी आजपर्यंत सर्व क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे मग श्रीमंत असणारे मराठे का गरीब मराठ्यांना पुढे घेऊन जात नाही? आजही श्रीमंत मराठ्यांच्या संस्था, कारखाने, शाळा कितीतरी बाबी आहेत. मी असेही श्रीमंत मराठे पाहिले, स्वतःच्या संस्था काढल्यात, व संस्थेतील कर्मचारी वर्ग संस्थेच्या मालकाच्या घरच्या फरश्या पुसण्याचे काम...

कार्ल मार्क्स...

तू हरला मार्क्स... तुला तुझ्याच लोकांनी हरवले... तू भारतात टिकू शकत नाही... हेच सत्य आहे... आज जे मार्क्‍सवादी , कम्युनिस्ट , कॉम्रेड बनू फिरू पाहतायत ते एक ढोंग आहे. भारतातील बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, यांना कमी लेखण्यासाठी त्यांनी तुला सोईनुसार जवळ केले. तुझे तत्वज्ञान सर्वतोपरी असले तरी भारतात शोषित वंचितांच्या लढाईसाठी तुझे तत्वज्ञान कमी पडते. तू ज्या भांडवलशाहीचा विरोध करतोस ती भांडवलशाही भारतात आहे कुठेय? तू ज्या युरोप मध्ये बसून प्रगाढ मोठे ग्रंथ लिहिले त्यात जातीचा कुठलाही उल्लेख नाही. भारतात जन्म तुझा झाला असता तर जातीवरून देशातील पीडितांना काय सोसावे लागले हे तुला समजले असते आणि दास कॅपिटलच्या दुप्पट व्हॉलुम इथल्या जात व्यवस्थेवर तू लिहिले असते.  तुझ्या तत्त्वज्ञानात गरीब व श्रीमंत दोनच वर्ग आहेत , पण तुला माहिती आहे का भारतात गरिबीचे कारण समाजिक मागासलेपण आहे. भारतात स्वतःला अर्थतज्ज्ञ म्हणणारे लोक गरिबीचे कारण समाजिक मागासलेपण आहे याकडे साफ दुर्लक्ष करतात. गरिबीमधील 85% लोक हे समाजिक दृष्ट्या मागास आहेत आणि त्यातील 50% हून अधिक लोक पूर्वास्पृश्य आणि आदिवासी आहेत. दुसर...

भारतीय सिनेमा आणि #Oscars2024

भारतीय सिनेमा आणि ऑस्कर यांचा संबध फक्त भारतातून सिनेमाचे ऑस्करसाठी नाव पाठवणे इतकाच आहे. सिनेमा इथून जसा जातो, तसेच गटांगळ्या खात बाहेर पडतो आणि ओपेनहाइमरने सात ऑस्कर जिंकले म्हटले की आपण फक्त तोंडात बोटे घालून पाहत राहतो. भारतात सिनेमा मनोरंजनाच्या पलीकडे गेलाच नाही. भारतीय सिनेमा एका पारंपारिक पद्धतीने लोकांसमोर आणल्या गेला. नाचणे , गाणे , आयटम साँग , हीरोची एंट्री , मारधाड , सेक्स , शिव्या , अश्लील भाषा , जात , धर्म , प्रेमप्रकरण , विरह , दुःख , सुख , परिवार यामध्येच आपला सिनेमा अडकला. चंगळवादी पिढीचे चंगळवादी जगणे, हिरोईन श्रीमंत, हीरो गरीब तर कधी हीरो श्रीमंत तर कधी हिरोईन गरीब, त्यांना एकमेकांवर प्रेम होणार आणि मग लग्न करणार. भोळ्याभाबड्या जनतेला प्रेमाच्या पुढे भारतीय सिनेमाने काही दाखविले आहे का? भारतीय सिनेमा इतका आमच्या पिढीवर हावी झाला की आमच्या प्रेमाच्या संकल्पना देखील आमच्या नसतात ते एका डायरेक्टर आणि हीरो हिरोईन पडद्यावर काय दाखवतात त्यावर अवलंबून असतात. प्रेमही दाखवले तरी अर्धवट दाखवणार मध्येच दुश्मन एंट्री घेणार आणि असा आमचा सिनेमा कधी संथपणे तर कधी जलद गतीने पुढे जाण...