सत्याचे यशस्वी प्रयोग करणार्या गांधीचे सत्य -
गांधी जाती निर्मूलनाचे काम करतच होते म्हणे ,बरं! आणि म्हणूनच त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ नाकारला , अस्पृश्यांनी स्वतंत्र राजकीय ओळख ठेवू नये , त्यांनी तथाकथित सवर्णांच्या छत्राखालीच राहावे , असे कायम आग्रहाने सांगितले. जर गांधींना अस्पृश्यांचा खरा कळवळा असता , तर त्यांनी बाबासाहेबांच्या मागण्यांना विरोध केला नसता. पण गांधींच्या सुधारणा नेहमीच उच्चवर्णीयांच्या चौकटीत बसणाऱ्या आणि त्यांचे वर्चस्व टिकवणाऱ्या होत्या. ब्राह्मण सुधारणा चळवळ राबवली म्हणे , यापेक्षा मोठा जोक असू शकत नाही. मंदिरे , शिक्षणसंस्था आणि समाजव्यवस्थेतील ब्राह्मणी वर्चस्व संपवण्यासाठी त्यांनी कोणते ठोस पाऊल उचलले? अस्पृश्यांना जातीय गुलामीतून मुक्त करण्याचा खरा मार्ग सत्तेच्या समीकरणात त्यांना स्थान देण्यात होता , पण गांधींनी ते स्पष्टपणे नाकारले. गांधींच्या सुधारणा म्हणजे - अत्याचार सहन करा , पण प्रेमाने. अस्पृश्यांनी कोणताही लढा देऊ नये , स्वतंत्र राजकीय सत्ताकेंद्र उभारू नये , यासाठीच त्यांनी अस्पृश्यांसाठी ‘हरिजन’ हा अपमानास्पद शब्द वापरला. याला कोणत्या अर्थाने सुधारणा म्हणता येईल ? अस्पृश्यांनी आपल्य...